कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, १२ मे, २०२०

चैतन्याचा झरा



चैतन्याचा झरा

ही गोष्ट आहे 2000 मध्ये मी बीए ला होतो. घरची परिस्थिती जरा बेताचीच होती मला बीए करून बीएड करायचं होतं कारण माझे ध्येय होतं शिक्षक होणे त्यावेळेस अनुदानित साठी 14 हजार रुपये आणि विनाअनुदानित साठी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये  एवढे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये भरण्यास मी असमर्थ होतो.जर चांगले मार्क मिळाले तर माझे बी.एड.फक्त चौदा हजार रुपयांमध्ये होणार होते.
मग माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक होता चांगले मार्क पाडणे.त्यामुळे बीए ला प्रथम श्रेणी मध्ये येण्यासाठी माझी धडपड सुरू झाली.मी गावात रहात होतो.माझे गाव कल्याण पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे.गावात घरी सतत मित्र,माणसे यांचा राबता असायचा.त्यामुळे मला अभ्यासात सतत व्यत्यय यायचा.मग मी घरा पासून दहा पंधरा मिनिटे चालायला लागतील एवढ्या दूर अंतरावर आमराईत
आंब्याच्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचो.दुपारी दोन वाजेपर्यंत मी असल्यास करायचो मग जेवण करून ताबडतोब पुन्हा आमराईत जायचो.माझी ही केविलवाणी धडपड पाहून मग आई रोज भर दुपारी रणरणत्या उन्हात माझ्यासाठी जेवणाचे भरलेले ताट हातात  पाण्याचा तांब्या (तेव्हा पाण्याच्या बाटल्यांचा जन्म झाला नव्हता) घेऊन आई वाट तुडवत यायची.मी आईच्या समोरच हात धुवायचे आणि पटापट चार घास पोटात घालायचो. मग आईच्या पदराला हात पुसून पुन्हा अभ्यासाला लागायचो.मला हे जगातले सगळ्यात मोठे सुख वाटायचे.मी  सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत जोपर्यंत डोळ्यांना दिसते.तोपर्यंत मी वाचत राहायचो.पण आंध्र पडून गेला की आईचे डोळे वाटेकडे लागायचे.जास्तच उशीर झाला की आई मला शोधत आमराईत यायची.जगात एवढे प्रेम फक्त नि फक्त आईकडे असते.आता आई रक्त चालली आहे.आयुष्याचे काही वर्ष शिल्लक राहिले आहेत.पण हा प्रेमाचा झरा अजून आपला नाही. तो कधी अटूच नये.माझे वडील तर लहानपणच माझा हात आईच्या हाती देऊन दूर निघून गेले.पण आईच्या प्रेमाचा निखळ  झरा माझ्यासाठी ठेऊन गेले.तोच मायेचा झरा माझ्या आयुष्यात चैतन्य आणतो.याच झ-याच्या ओढीने शाळेला सुट्टी लागली की पाय आपोआप माझ्या जन्मगावी धाव घेतात.
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
कल्याण ठाणे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा