गेल्या चार पाच महिन्यापासून अप्रिय बातम्यानी मन घायाळ झाले आहे.नकोनको अशा बातम्या मनपोखरून टाकत आहेत.कोरोना नावाचे संकट दूर कोठून तरी चीनमधून हळूहळू भारतात घुसले, आणि पसरलेही.आता कोरोनाने चांगलेच ठाण मांडले आहे.नव्हे हातपाय पसरले आहेत.असंख्य जीवांचे प्राण घेऊन ही अजून तो थांबायला तयार नाही.असंख्य माणसे आपल्याहून आगदी अगंतूक निघून गेली.जगाचे काय नुकसान व्हायचे ते झालेच.पण आमच्या पोई,ता.कल्याण गावातील दोन सख्या भावंडांनी या जगाचा निरोप घेतला.ही घटना समस्त ग्रामस्थांना चटका लावणारी घटना होय.कै.चंद्रकांत हरड,आणि कै. बाळाराम हरड, या दोन ग्रामस्थांनी जगाचा निरोप घेतला.
दोघे ही सरकारी सेवततून सेवनिवृत्त झालेले.कै.चंद्रकांत हरड आयुध निर्माणी अंबरनाथ येथे तीस जूनला सेवानिवृत्त झाले.तर कै.बालाराम हरड सात आठ वर्षांपूर्वी प्रदीर्घ शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.पण सेवानिवृत्ती नंतर आठच दिवसात कोरोनाने त्यांना आपल्यातून ओढून नेले.आणि वीस जुलै रोजी कै. बाळाराम हरड यांनीही जगाचा निरोप घेतला.दोघांचे येथून जाणे चटका लावणारे.
नोकरी निमित्ताने ते आपल्या गावापासून थोडे दूर रहात होते.पण मनमात्र कायम गावात गुंतवून राहिले.त्याचे सतत पोई येथे येणे होते.बाळाराम हरड सच्चे कलावंत होते. गावात त्यांना अदराने सारे गुरुजी संबोधायचे.एक नाट्यवेडा माणूस.पोई गावची परंपरा ही नाटकांची आहे.जुन्या जाणत्या कलावंतात त्यांनी अभिनय केला.ऐतिहासिक नाटकातून आणि सामाजिक नाटकातून त्यांनी अभिनयाची चुनूक दाखविली.
त्यांच बरोबर नव्या जोमाच्या मंडळीत ते अभिनय करायचे.माझ्या गावाने एक सच्चा नाट्यकलावंत गमावला.
माझ्या चुलत्यांबरोबर त्यांची लहानपणापासूनच ची दोस्ती होती.खरे तर ते एक शिक्षक पैसा आडका असणारा माणूस, तर माझे चुलते शेतकरी,पण दोंघाममध्ये गरीबश्रीमंताची भिंत कधी उभीच राहिली नाही.गेल्या साठ पासष्टाव्यावर्षीही त्यांची मैत्री आबादित होती.आगदी या जगाचा निरोप घेण्या आधीही ते आपल्या मित्राच्या घरी पायधूळ झाडून आलेच.ती त्यांच्या मधिल शेवटची भेट.
सेवानिवृत्ती नंतर त्यांनी स्वतःला अध्यात्मा मधे बांधून घेतले.आणि ईश्वरसेवेत आपला वेळ देऊ लागले.गावात महिला भजनी मंडळ असावे.ही कल्पना गुरुजींची ती त्यांनी प्रत्येक्षात आणली.ते स्वतः हारमोनियम वादक होते.त्यामुळे गावातील महिलांना त्यांनी भजनाचे धडे गिरवले.
आणि भजनीमंडळ तयार केले.ही गावाला दिलेली गुरुजींची देणगी.
भागवत सप्ताहा हनुमान जयंती,काकड आरती.मधे गुरुजी सक्रिय असायचे.जणू आपल्या घरचेच कार्य समजून ते झटायचे.आमच्या गावातील एक सांस्कृतिक ठेवा म्हणजे भजनी भारुड.पूर्वापार चालत आलेली ही परंपरा जवळ जवळजवळ नष्ट होत आली होती.पण गुरुजींमधल्या कलावंताने एकनाथांची भारुडे जीवंत केली.पुन्हा नव्या जोमाने ते हनुमान जयंतीच्य मिरवणुकीत ते रात्रभर भारुडात तल्लीन व्हायचे.आपली पत्नी, भावजय यांनाही त्यांनी भारुडात आणले.आणि गावचा हा सांस्कृतिक ठेवा जिवंत ठेवला.गुरुजीं गाव आपल्याला कधीच विसरणार नाही. आपल्या जाण्याने गावातील ग्रामउत्सवा मध्ये नक्कीच आपली आठवण येत राहील.आपणास दोघा बंधुना ही भावपूर्ण श्रध्दांजली.