कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

तुम्ही what's app वर आहात का?

एखादा जुना मित्र अथवा ओळखीचा चेहरा दिसला की सहज थोड्या गप्पा होतात मग एक प्रश्न विचारला जातो. "तुम्ही what's App वर आहात का ?" झालं बोलणं आपोआप आखडलं जातं.पुढे एकमेकांचा नंबर घेतला जातो काल भेटलेल्या मित्रा कडून "Hi" संदेश येतो.आपण पण हाय~~" असा प्रतिसाद देतो.अधेमधे एखादा गुळमुळीत झालेला संदेश काॅपी पेस्ट करून धाडतो.समोरून ही मचूळ सगळ्या ग्रुप वर चोथा झालेली कविता येथे.पुढे अशीच गर्दी व्हाटस्अप वर वाढत जाते. नाती तयार होतात. वेगवेगळे ग्रुप तयार होतात. आपण त्या समुहाचे सदस्य होतो.येथे नवीन काय काहीच नसते.फेसबुकचे फोटो. येथे येतात येथून तेथे जाणार. काॅपी पेस्ट स्वनिर्मित असे काही नसते. काही काम नाही मग द्या शुभेच्छा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री,इतकंच काय रविवार च्या पण शुभेच्छा येतात. जशी मानसांना किंमत नाही तसंच शुभेच्छांचं झालय.फक्त वेळ घालवूपणा चालू आहे. शुभेच्छांना किंमत उरलेले नाही. दिवसभर माणूस वाॅटस अॅप मधे दंग असतो.दूरच्या माणसांशी बोलत असतो.आणि जवळ असणा-या माणसांशी बोलायला त्याला वेळ नाही किती अजब गोष्ट पहा. बरं वाॅट्स अॅप वर समूह एवढे की मोजता येत नाही. बरं समुहावर काय नवीन काहीच नाही दुनिया गोल आहे हे सिध्द होणारी गोष्ट कारण एखादा चांगला मजकूर आपण पाठवला की काही दिवसात तो पुन्हा आपल्यालाच येतो.तेच फोटो तेच शब्द तेचा मजकूर .बरं काही समुहात अश्लीलता एवढी असते की सांगता सोय नाही. आपण किती निर्लज्ज आहोत. की दुस-याला काय पाठवावे तेही आम्हाला कळत नाही. बरं जे जोक येतात ते थोरांच्या नावाने. आपण आपल्याच महान पुरुषांशी विटंबना करतो हेही आम्हाला कळत नाही. . मित्रहो माणसं जोडा संगळ्यांबरोबर बोला विचारांची देवाने घेवाण होऊद्या.प्रत्येकाचे विचार वेगळे आपण आपले विचार दुसर्यावर लादू नका. मी म्हणतो तेच खरे हा हट्ट सोडा.दुसर्याचे चांगले विचार त्यांच्या नावासह पाठवा .साहित्यचौर्य हा गुन्हा आहे. शेवटी खोटेपणा उघड होतोच. चांगल्या ग्रुप वर याची चर्चा होतेच. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. कारण नसताना इतिहास दूषित करू नका. खोटं लिहून. या पुस्तकात असे लिहले आहे. याचे दाखले देवू नका.हसा आणि हसवा.अस्सल विनोदंची देवानघेवान करा मनोरंजक माहिती दुसर्यांना पाठवा. आफवा पसरून देवू नका. खात्री चे वृत्त पुढे पाठवा. परस्त्री माते समान मानून कोणत्याही अनोळखी महिलेची छायाचित्र,व्हिडीओ पोस्ट करू नका चुकीचा व्हयरल झालेला फोटो, व्हिडीओ रोखणे फार आवघड तेव्हा पोस्ट करते वेळी काळजी घ्या. विनोदाने पाठवलेला एक शब्द एखाद्या चे जीवन संपवू शकते. एखादा बदनाम होऊ शकतो हे विसरून चालणार नाही. व्हाटस्अप वर किती मित्र आहेत त्या पेक्षा ते कसे आहेत हे फार महत्वाचे. आपल्या व्हाटस्अप वर किती गर्दी आहे. या पेक्षा आपण नाती कशी सांभाळत आहोत याला महत्व आहे. दूरचे मित्र जवळ येतात. मात्र समोरासमोर होणा-या गप्पा रंगत नाही ही खंत आहे. पारावरच्या गप्पा बंद होत आहेत. राजकारणातील गप्पा जवळ जवळ नामशेष झाल्यात.वाचन कमी होत चाललं आहे. पुस्तकांची कपाटे बेवारशी पडली आहेत. वाचनालय नि तेथील कर्मचारी वाचकांची वाट पहात आहेत. आणि आम्ही तरूण गुरफटुन गेलो आहोत . वाॅट्स अॅप वर. आता आम्ही लिहणं ही हरवतो की काय अशी वेळ आली आहे. पैशाचा नि वेळेचा अपव्यय होत आहे आणि आम्ही म्हणतो वेळ नाही. सुसंवाद विसरलोय आम्ही. गप्पांचे फड विसरलोय आम्ही. वाॅट्स अॅप ची गरज किती? महीत नाही. पण आम्ही खो खो हसणे विसरलोय .माणूस माणसाला विसरला आहे. प्रा.श्री. धनाजी जनार्दन बुटेरे पोई कल्याण ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा