भुई
क्षितीजाने एकदा
भुईला म्हटले.
तू किती छान आहेस.
भुई म्हणाली क्षितीजाला
तू तर फुललेलं रान आहेस.
तेव्हा पासून क्षितीज
धरणीची आस ठेवून जगतो.
धरती एकदा मिठीत घेईल
ध्यास घेऊन जगतो.
कधी धरती साथ देईल
म्हणून क्षितीज निढळावर
ठेवून आहे हात.
धरेने निसंकोच
फुलून घ्यावे अंतराळात.
धनाजी बुटेरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा