तेव्हा रांगत असायची अवतीभवती.
त्यांची काय ती नवनवती.
त्यांच्या खिदळण्याने घर झोपायचे.
आणि रडण्याने घर उठायचे.
आईच्या पदराआड घरभर..
रांगायची चिमुकली पावलं.
आणि आजीचा शब्द
अलगद घ्यायची कानात साठवून.
घराला घरपण होते.
बाईला आई पण होते..
त्यांची पाटी पुस्तके,
वाचायला शिकलं हे घर,
आता काळ सरकला थोडा पुढे.
पिल्लांच्या पंखात बळ आले.
ती उडायला शिकली.
आता बाबा आणि आई
त्यांच्यासाठी कोण कुठले?
कारण पिल्लांना आता पंख फुटले.
प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा