मी कधी लिहायला लागलो हे मला स्पष्ट आठवते. 1993 सप्टेंबर महिना मी काॅलेज मध्ये शिकत होतो.मराठी कविता या साठी महनोरांच्या " रानातल्या कविता " हे पुस्तक अभ्यासाला होतं.प्राध्यापक श्री.अरूणा देवरे सर कविता शिकवायचे त्यांचा प्रभाव मनावर होताच. दहावीला बालकवींच्या " फुलराणी "या कवितेने मनावर मोहिनी घातली होती.बहिनाबाईंच्या कविता मनावर अधीराज्य गाजवत होत्या. नुकताच वरवर वाचण करायला लागलो होतो.इंदिरा संताचा "मृगजळ "अभ्यासाला होता. आणि याच काळात लातूर मधिल किल्लारी येथे भूकंप झाला होता. 1993 चे ते भयानक "बाॅम्बस्फोट" माझ्या जीव्हारी लागले. नि माझ्या पहिल्या
"विपरीत" या कवितेने जन्म घेतला.
जगात विपरीत घडले ;
जमिन हलली
लोकांच्या उरावर ;
घरं कोसळली. ॥
जगात विपरीत घडले ;
ऐन दिवाळीत ,
रेल्वेत बाॅम्ब उडले
जगात विपरीत घडले ;
हे शब्द मला सुचले. लिहीण्यात एवढी सुस्पष्टता नव्हती. प्रगल्भता नव्हती. पण मला ती कविता वाटली. पुढे अशाच रचना स्फुरत गेल्या. मी कागदावर उतरून घेत गेलो.आता कविता हा आवडीचा विषय होऊन गेला. कविता वाचन कवितेचा अभ्यास करून पुढे लिहीत राहीलो. मित्रांना घरातल्या माणसांना वाचायला देवूनी लागलो.कुणी खूप छान म्हटले की काय तो आनंद. फक्त " स्वांतसुखाय "म्हणून लिहीत राहीलो. साधारण पन्नास रचना झाल्या असतील मला कुठे तरी छापून याव्यात असं वाटायचं. इतर साहित्यिकांचे पुस्तकात छापलेले पाहून मला ते वाटू लागले. बस्स ठरलं कुठे तरी प्रकाशित झाल्याच पाहिजेत मनात चंग बांधला. वर्तमानपत्रात कुठे साहित्य पाहिजे असल्याचे छापून येई मी माझ्या कविता सर्वत्र पाठवू लागलो.कदाचित कुठे छापले पण जात असेल पण ते अंक माझ्या हाती येत नव्हते. लिहायला संधी दिवाळी अंकात मिळायची. भरपूर आवाहने वर्तमानपत्रात येतात. पण ही मंडळी आपला अंक निघाला की त्या साहित्यिकाला विसरतात. एक अंक ही कर्मद्रारिद्र मंडळी त्या नवोदित साहित्यिकाला पाठवत नाही. काही मंडळी याला अपवाद आहे. असो.अशाच एका दिवाळी अंकात माझी "दिवाळी "ही कविता छापून आली. काय तो आनंद? शब्दात सांगू शकत नाही. माझ्यातल्या कवी ला ऊर्मी मिळाली. हेच ते रसायन जे साहित्यिकाला हवे असते. पुढे दरवर्षी दिवाळी अंकात काही कविता प्रकाशित होऊ लागल्या.लिखाणाला नवीन उम्मेद मिळाली कविता लिहिण्याचा वेग वाढला.झपाटल्यासारखा लिहू लागलो.शंभर च्या वर कविता लिहून झाल्या काही खूप सुंदर कविता आहेत. मग मोर्चा साहित्य स्पर्धा कडे वळविला. काव्यस्पर्धांसाठी कविता पाठवू लागलो. बर्याच वेळा ना उम्मेद झालो अपयश येत गेले. पण लेखण प्रपंच सोडला नाही. अशाच वेळी एका राज्यस्तरीय कविता स्पर्धेमधे "झाली माझी साठी" या कवितेला उत्तेजनार्थ व लगेच काही दिवसात "झोपडी"माझ्या कवितेला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे बर्याच कविता स्पर्धेमधे एक दोन उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले. याच वेळी एक मोठी संधी मला मिळालीआकाशावाणी वरमाझा काव्य वाचनाचा कार्यक्रम वाचून झाला पुढे "युवा काव्य पुरस्कार " देशप्रेमी" पुरस्कार. "काव्यभूषण "पुरस्कार. "कलायत्री पुरस्कार ."नांदब्रम्ह" पुरस्कार. "' ॐ साई" काव्य पुरस्कार. हे काव्य लेखनासाठीचे पुरस्कार मिळाले. खूप आनंद वाटला. लिहायला प्रेरणा मिळत गेली. आपयशाने कधीच खचलो नाही. कथा लेखनाकडे कसा वळलो हे मात्र कळले नाही. माझी दुसरी कथा "कशा साठी पाण्यासाठी. .....?" या कथेला तीन कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. ही कथा पाच सहा मासिकात दोन दिवाळी अंकात प्रकाशित झाली.त्या नंतरची "ठोल्या "ही माझी तिसरी कथा एका दिवाळी अंकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत विजेती ठरली. पुढे असंख्य कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या. कथा बरोबर एकांकिका लिहून पाहिली. एक नाटक ही लिहले "देवा शपथ खरं सांगते" पण आज माझ्या कडे याची प्रत नाही घरी कुठे तरी रद्दीतून बाहेर पाडली. ती कायमची. पुन्हा नाही लिहले मग. आपण कवी म्हणून नावारुपाला यावे असे मनोमन वाटते. पण तसा मंच नवोदितांसाठी नसतो.नवीन लेखकांचे साहित्य दर्जेदार नसते अशी ओरड होते. पण मला वाटतय वाचक वलय असणारी मंडळीच्या वाचनासाठी विचारात घेतात .कविता हा साहित्य प्रकार विकत घेऊन वाचवायचा नसतो.आणि तो अपरिचित कवीचा असेल चाळून सुध्दा पहायचा नसतो या धारना साहित्य विश्वात रुळलेल्या आहेत. याचा सर्वांधिक फटका नवीन कवीना बसतो.
✒ श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
djbutere@gmail.com
( c ) copyright
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा