कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

आकाशवाणीने भारावलेले दिवस ( भाग एक )

                              तो कालच तसा होता.तेव्हा करमणुकीसाठी आजच्या सारखी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमे नव्हती. विटीदांडू.सुरपारंब्या,पोहणं, गोटया,झालंच तर एखाद्या चिंध्याच्या पासून तयार केलेल्या चेंडूने आबाधबी खेळायची,आबाधबी म्हणजे काय ?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चिंध्याच्या चेंडू ने एकमेकांना मनसोक्त बडवणे."चोर पोलीस हा एक खेळ आवडीने खेळायचा .एकूण काय ? तर बिनभांडवलाचे सर्व खेळ खेळले जायचे.जोडीला कुस्ती, कबड्डी होतेच. तर हे सारे खेळ आम्हा मुलांचे मनोरंजन करायचे.तेंव्हा क्रिकेट कशा बरोबर काय खातात एवढं माहीत नव्हते. या मातीतील खेळ खेळून च आमुची पिढी मोठी झाली. म्हणूनच आमचं आणि या मातीचे नाते घट्ट आहे. त्यावेळी शाळेतपण भारतीय पध्दतीचे खेळ शिकविले जायचे. शाळा सुटली की बच्चेकंपनी मातीतल्या खेळात रामायची.त्यावेळी पालक ही आजच्या सारख्या मुलांनी नव्वद टक्के च पाडले पाहिजेत अशा खोट्या अपेक्षा बालगत नव्हते. आणि म्हणून आमची पिढी रांगडी होती. अशा परीस्थितीत वाढलेला मी पण मी या खेळात जास्त रमलोच नाही. कारण माझं भावविश्व वेगळे होते. लहान मुलांनी रमावे अशी ठिकाणे फारच कमी.आमच्या लहानपणी आताच टिव्ही गावात आला होता.करमणुकीचे दुसरे साधन म्हणजे " रेडिओ "गावात मोजून पाच सहा रेडिओ असतील. रेडिओ ऐकने हा माझा सर्वात आवडता छंद. आजही एखादे गाणं लागले तर त्या गाण्यांचा कवी ,संगीतकार, चित्रपट, गायक ,माझे तोंडपाठ आहेत. असा हा रेडिओ माझा सखा झाला होता.रेडिओ ऐकता ऐकता मला एक त्यात आनंदाचे ठिकाण सापडले.आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यावेळी अनेक पत्रउत्तराचे कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे श्रोत्यांचे नाव व पत्ता सांगून दिले जायचे. मला याचे फार अप्रुप वाटे .आपलं ही नाव असे येईल काय ? या कुतूहला पोटी पाच सहा पत्र आकाशवाणीला लिहीली प्रथम थोडे अपयश आले पण ओढ स्वस्थ बसून देईना पुन्हा पाच सहा पत्र पाठविले आणि एका दिवस माझं आख्खे पत्र वाचून दाखवण्यात आले.त्या दिवशी स्वर्ग फक्त दोन बोटावर उरले होते. मग पत्रलेखन हा माझा छंद च बनला. आकाशवाणीवर असा एकही कार्यक्रम नसेल ज्यात माझं पत्र आले नसेल. महिन्याला पंचवीस तीस पत्र लिहायचो त्यातील पंधरा सोळा पत्र वाचून दाखवली जायची.मला खाऊसाठी मिळालेले पैसे मी पोस्ट कार्डं विकत घ्यायला वापरायचो.हळूहळू मला लोकं विचारून लागली आजुबाजुच्या गावातील एखादा माणूस माझी चौकशी करायचा खूप बरे वाटायचे.मग मोर्चा हळूहळू विविध भारती, पुणे आकाशवाणी केंद्रावर वळविला .या केंद्रावर माझी पत्र येऊन लागली. "आपली आवड" "कामगार सभा" "युववाणी" "सखी" "माझं आवारा माझं शिवार" "बालदरबार" "गंमत जमंत" हे सर्व कार्यक्रम माझे आवडते झाले होते .या सारख्या कार्यक्रमात मी पत्रे लेखन सातत्याने करत होतो.आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझी एका वेगळी पत्र लेखक म्हणून मी ओळख तयार केली होती. ती म्हणजे " माझ्या हातात सुंदर हस्ताक्षरातील पत्र आपले नेहमीचे पत्रलेखक"...असं उदघोषकाने म्हटले म्हणजे पत्र माझंच वाचलेले जायचे.हा एक वेगळा आनंद होता. इयत्ता आठवी पासून लागलेला हा छंद पुढे बी.ए.झालो तरीही होताच. पुढे हा छंद सुटला; कसा ते नाही आठवत.आपलं पत्र कार्यक्रमात वाचलं जावं म्हणून तेव्हा कल्पकतेने लिहू लागलो.नवीन कल्पना वापरू लागलो. "बालदरबार" लहानपणी फार आवडायचा तो आठवड्याला रविवारी एकदाच असे म्हणून मी वाट पहायचो कारण त्यामध्ये बालकथा कविता सादर केल्या जायच्या. मला कविता आवडतात त्या त्यावेळेस पासून. या कार्यक्रमात मी लहान मुलांनासाठी छोट्या छोट्या कविता पत्राने पाठवायचो कधी कधी कविता वाचून दाखवली जायची तेव्हा काय आनंद व्हायचा शब्दात नाही. मांडता येणार. रेडिओ ऐकून विचारांची बैठक पक्की झाली. त्यामुळे आकाशवाणी नेहमी जाहीर केलेल्या विविध लेखन स्पर्धेत मी भाग घेऊ लागलो त्यातून बक्षिस मिळत गेली आणि माझ्या छंदाला अर्थांजन होवू लागले.त्यातून आत्मविश्वास वाढला.आणि वेगवेगळ्या आकाशवाणी वर होणा-या स्पर्धेत भाग घेऊन लागलो.पण मला लेखनाचा छंद जडला एवढंच मात्र नक्की. (भाग 2 पुढील पानावर)
         ✒प्रा.श्री. धनजी जनार्दन बुटेरे
                  मु.पोई,कल्याण;ठाणे
                   📞9930003930

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा