पुढे शिवकृपेने आदिवासी विकास विभाग ठाणे. येथे प्राध्यापकाची नोकरी मिळाली. पण ती ही ठाणे जिल्ह्यातील अतीदुर्गम जव्हार तालुक्यातील विनवळ या खेडेगावात येथे जीव मरायला वेळ लागला.घरापासून प्रथम एवढ्या दूर एकटाच रहात होतो.येथे निसर्ग सुंदर आहे. पण माझ्यातील कवी ला एकटेपणा जाणवू लागला येथे कविता फुलावी तशी फुलली नाही. एकूण सात वर्षे माझे येथे वास्तव्य होते पण मोजून शंभर एक कविता लिहिल्या असतील. दोन कथा एवढे काय ते लिखाण हातून घडले.पण कविता कोमेजून दिली नाही. याच काळात 2006 रोजी आकाशवाणीवर माझा कविता वाचनाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारीत करण्यात आला. पुन्हा पुढे सहा महिन्यांनी कथा कथनासाठी मुंबई केंद्रावरून बोलावण्यात आले. "कशा साठी पाण्यासाठी "ही कथा मी त्यावेळी सादर केली. पुन्हा दोन वेळा पाच पांच मिनिटांची भाषण दिले. कृतकृत्य झाल्या सारखे वाटले. हे तुमच्या साठी छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप मोठी झेप आहे. हे सारे मी स्वतःच्या जोरावर केले कुणाची ही काडीची मदत घेतली नाही. स्वयं कर्तृत्वाने सारे केले. म्हणून आनंद जास्त वाटतो. पुन्हा बदली गांवा जवळ झाली. आणि लेखनाला गती मिळाली. मनसोक्त लिहू लागलो. दरवर्षी. असंख्य दिवाळी अंकात माझे साहित्य छापून येते. असंख्य कवी संमेलनात सहभागी होतो.कविता स्पर्धेत सहभागी होतो. विजेत्यांच्या यादीत माझे नाव पाहून सुखावून जातो.नोव्हेंबर 2016 मध्ये माझी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कल्याण ग्रामीण शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हे सारे स्वकतृत्वाने मी मिळवले धन आहे.मला कुणी गाॅडफादर लागत नाही तुमच्यात जर कर्तृत्व असेल तर तुम्हाला कुणी पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. या नंतर मी अजून एक छोटा प्रयोग केला.माझ्या कवितांचे स्वतःच्या आवाजात व्हिडीओ तयार करून युटूबवर टाकावा असं वाटू लागले म्हणजे आपली कविता जास्त लोकांपर्यंत पोहचले पण इंटरनेट विषय आमची पिढी अनभिज्ञ आहे. पण मी स्वत हे सारं केले. आणि युटूबवर माझा व्हिडीओ तयार झाला. हे फार मोठे काम नाही पण मला हे दिव्य वाटत होतं.आज माझ्या बर्याच कविता युटूबवर आहेत. हे पाहून आनंद वाटतो. लिहले खूप आहे. पण प्रकाशित झाले नाही. आज माझ्याकडे पाच सात पुस्तके तयार होतील ऐवढे साहित्य आहे. जसे जमेल तसे तुमच्या समोर पुस्तक रुपाने येईल. नाही तरी मी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करणार आहे.तसे काही लिहावेसे वाटले तर माझा ब्लॉग वर लिहितो.djbutere@blogspot.com हा माझा ब्लॉग. येथे मी जमेल तसा लिहितो.WhatsApp वा fecebook वर मी जास्त लिहीत नाही कारण येथून साहित्य लोक मोठ्या प्रमाणात चोरतात.आणि आपल्या कविते खाली आपलेच नाव टाकायला जरा संकोच वाटतो. साहित्यातील सर्वच प्रकार मी हाताळले आहेत. कथा, कविता, ललित, एकांकिका, चारोळ्या, लेख, बालकवीता,लेखन ही माझे पहिले प्रेम आहे. मी ते करत रहाणार. आज तेवीस वर्षे झाली मी लिहीत आहे. त्यातून मला ऊर्जा मिळते.आनंद मिळतो.कोणी काय पण करो त्याचा मूळहेतू आनंद प्राप्ती हाच असतो. शेवटी एक कुणा कवी ची एक ओल आठवली. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठांवरी ओघळावा.
✒ श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे
djbutere@gmail.com
( c ) copyright
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा