https://youtu.be/Yx841JEAgR4
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
सोमवार, २४ जानेवारी, २०२२
"खरंच गुरुजी फुकट पगार घेतात का ?"
"खरच गुरुजी फुकट पगार घेत होते का ?"
लहानपणापसून आपला आपल्या शिक्षकांबरोबर फार वेळा सबंध येतो.ब-याच मुलांची शिक्षक होईन असे स्वप्न असते.याचे कारण आपले आयडॉल आपले शिक्षकच असतात.आपले ध्येय तेच असते.अलीकडे मुले,डाॅक्टर, इंजिनिअर, पायलट, आय.टी.क्षेत्रात जाऊन करिअर करण्याचे स्वप्न पहात असतात.कुणी तरी आय.एस.अधिकारी होण्याचे स्वप्न पहात असतो.याचे कारण मोठे झाल्यावर आपले येणारी जगाशी सबंध.त्यामुळे आपण जसे मोठे होतो.तसे आपली स्वप्न बदलतात.
थोडक्यात काय आपल्या विचारांचा आवाका जितका मोठा.तितकीच आपली स्वप्न पण मोठमोठी भरारी घेतात.आपण कोणत्या समाजात वाढतो.?आपले मित्र कोण ?या वरही आपली स्वप्न ठरत असतात.पण आपण ज्या व्यक्तींच्या सहवासत अधिक काळ घालवतो.तेथेही आपली स्वप्न आकार घेत असतात.आपली सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर सुध्दा आपली स्वप्न ठरत असतात.कारण स्वप्नांना आकांक्षांचे पंख हवेत.आणि परिस्थितीचे आकाश हवे.तरच स्वप्न सत्यात उतरतात.अन्याथा स्वप्न स्वप्नच बनून रहातात.स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी एकतर तुम्ही जातीवंत हुशार हवेत,नाहीतर पैशाची जोड तरी हवी.!असे असेल तर स्वप्न लवकर आकाशात भरा-या घेतात.भारताचे माजी महामहीम डाॅक्टर अब्दुल कलाम म्हणतात."स्वप्नही जागेपणी पहायची असतात.तीच खरी स्वप्न.!"आपण दिवसा पहातो ती स्वप्न खरी सत्यात येत असतात.रात्री पहातो ती स्वप्न नव्हेच.त्यामुळे ते विद्यार्थ्यांना स्वप्न पहाण्याचा सल्ला देतात.
वरील माझा विवेचनाचा उद्देश मुलांच्या भावविश्वात शिक्षक नेहमीच घर करून असतात.शिक्षकाला असणारी सामाजिक प्रतिष्ठा.आता इतिहास जमा झाली आहे.तेव्हा तरी होतीच.आलीकडे मात्र सगळ्यांना फुकट आणि खूप पगार घेणारा प्राणी म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते.शिक्षक हा फुकट पगार घेतो.त्याला खूप सुट्या असतात.तो काहीच काम करत नाही.आता समाजात असे काम न करता पगार घेणारे शिक्षक असतीलही; पण फार थोडे चिमूटभर असतील.पण सगळेच तसे नाहीत.खरे पाहिले तर सरकारी शाळेतून बाहेर पडलेलेच सर्वात जास्त प्रशासकीय सेवेत आहेत.मग हे कसे शक्य आहे.त्याचा मूळ पाया याच सरकारी शाळेतील शिक्षकांनीच पक्का केलेला असतो. मग काम करत नाहीत हा लेबल आपण कसा काय लावून मोकळे होतो.?आता सरकारी सर्वच कर्मचारी तेवढ्याच सुट्टय़ा घेतात.जेवढे शिक्षक घेतात.किंबहुना कार्यालयात काम करणा-या कर्मचाऱ्यांला सर्वात जास्त सुट्टयाउपभोगता यातात.सरकारी कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी(यात शिक्षक नाही) कारण शनिवारी शिक्षक काम करतात.शिक्षक दर शनिवारी शाळेत असतात.मग सुट्टय़ा कोण जास्त उपभोग असतो.?
उलट दहावी बारावीचे गणित,विज्ञान यांचे जादा तास घ्यावे,लागतात.स्कॉलरशिप सारख्या परीक्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे,हे कामाव्यतिरिक्त जादा काम शिक्षक करत असतो.हे कुणाला कसे दिसत नाहीत.?
तरी शिक्षकांना का दोष दिला जातो.?कारण आपल्याला दिसतो तो शिक्षक हा एकमेव घटक आहे.जो भ्रष्टाचार न करता काम करतो.दुसरी गोष्ट शहरातून तो ग्रामीण भागात येऊन काम करतो.बाकी सगळ्याच घटकांना शहर खुणावत असते.एकदम दुर्बल घटकाचा आणि त्याचा सहसबंध येत असतो.गरिब पालक आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रेमाने शिक्षणाची शिदोरी देणारा फक्त शिक्षक असतो.आता आपण शहरातून गावात येणारे अजून कर्मचारी पाहू,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य कर्मचारी,आता ग्रामसेवक किती दिवस आणि किती वेळ कार्यालयात असतो विचार करा.तलाठी किती फेरीत आपल्याला भेटतात अनुभवा.बरे ब-याच वेळेस काम करण्यासाठी पैसे लागतात.शिक्षक तुमच्या मुलांकडून किती फी घेतो.सांगा.?कोणती शाळा आठवडाभर बंद असते सांगा?.मग तरी तुमच्या रडारवर गुरुजी का?कारण त्याचा पगार सगळ्यांना माहीत असतो.ग्रामसेवक, तलाठी पगारी नोकर असूनही तुमच्याकडून कामाचे पैसे घेतात.तरी त्याला आपण कधीच पगार विचारत नाही.कारण गुरुजी हाच मुली चेष्टेचा विषय झालाय आलीकडे.
लाॅकडाऊन मुले तर गुरुजी हीट लिस्ट वर आले.कारण सरकारी शाळेतील गुरुजी शिकवत नाहीत.आता सारेच सरकारी कर्मचारी कमी अधिक काम करत होते.कुणी घरी,तर कुणी कार्यालयात.पण पुन्हा सगळ्यांना दिसले ते गुरुजी.याचे सगळ्यात महत्वाचे कारण सरकारी शाळेत विद्यार्थ्यी येतात ते दुर्बल घटकातील.आता सगळ्यांकडे महागडे मोबाईल असतात असे नव्हे.पण खाजगी शाळेतील शिक्षक मात्र शिकवताना दिसले.आता पुन्हा गुरुजीवर आरोप कमी पगाराची माणसं शिकवतात मात्र जास्त पगार घेणारा सरकारी शाळेतील गुरुजी शिकवत नाही.आता खाजगी शाळेतील पालक धनदांडगे असतात घरी दोन तीन महागडे मोबाईल असतात.तेव्हा ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रीया सुरळीत पार पडते.गरिब पालकांकडे इंटरनेटचे रिचार्ज मारायला पैसे नसतात.तेव्हा महागडे मोबाईल कुठूनआणणार?.असले तरी एक दोन कमी अधिक पालकांकडे.त्या प्रमाणात शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.ब-याच सरकारी शाळेतील शिक्षकांनी धोका पत्करून कुणाच्या तरी घरी,कधीच चोरून शाळेत वर्ग घेतल्याचे मी पाहिले आहे.तेव्हा सरसकट शिक्षकाला आरोपीच्या पिंज-यात आपण त्याला उभे करून मोकळे होतो.
शिक्षकांना असणाऱ्या सुट्टया हा सर्वांना चुंगम सारखा चघलत बसायला लावणारा विषय.खरे तर सुटण्याची नियमावली शासन ठरवत असते.शिक्षकांना दीर्घ सुटी असते.तशीच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना एक महिन्याची 'अर्जीत रजा' असते.उलट ते वाटेल तेव्हा ती उपभोगू शकतात.मात्र शिक्षकाला ती सक्तीने मुलांबरोबर घ्यावी लागते.इतर रजाही जवळपास त्याच नियमाने सरकारी कर्मचारी भोगत असतात.जसे महीन्यात दोन शनिवार सरकारी कर्मचारी काम करता पण शिक्षक सर्व शनिवारी काम करतो.तरी गुरुजी कसे काय जास्त रजा उपभोगतात हा संशोधनाचा विषय ठरेल.
बरं गुरुजी शिक्षणात व्यतिरिक्त ही कामे करतो.जे कुणाच्या खिजगणतीत सुध्दा नसते.खिचडी शिजवा,जनगणना,मतदान प्रक्रियेत तर गुरुजी शिवाय तर चाक हलत नाही.शिरगणती,आमुक सर्वेक्षण करा,तमूक माहिती द्या चालू असते.बरं कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत लिपीत वा शिपाई नाहीत तरी सुध्दा सर्व कामे सुरळीत कशी पार पडतात.जरा शाळेत जाऊन गुरुजींचे दफ्तर तरी पहा.मग लक्षात येईल गुरुजी तारेवरची कसरत कशी करतात ते.
संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन असताना आदिवासी विकास विभागाचे शिक्षक गावपाड्यावर जाऊन मुलांना शिकवत होते.दुसरी गोष्ट आदिवासी विभाग मार्फत गरजू दुर्बल घटकातील आदिवासी जातीजमातीच्या लोकांना खावटी वाटपासाठी गावपाड्यावर फिरत होते.प्रथम सर्वे,नंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया,तद्नंतर आधार कार्ड, रेशनकार्ड, गोळा करत गुरुजी फिरत होते.त्यानंतर बॅकेचे अकाऊंट नंबर,माहितीचे संकलन,यासाठी आता पर्यंत गाव पाड्यावर दहापंधरा चक्रा मारत आहेत.आज दोन वर्षांत किती तरी शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन जीव गमवावा लागला आहे.अजूनही शिक्षक खावटी वाटपासाठी फिरत आहेत.शासनाकडून एक छदाम सुध्दा शिक्षकांना मिळाला नाही.कारण एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून तो धडपडत राहिला.पदरमोड करून अजूनही तो भटकतो आहे.कोणत्या खात्यातील कर्मचारी जीवावर उदार होऊन फिरत होते? कोणीही नाही मग गुरुजी पगार फुकट कसा घेतो.कुणी सांगाल का?एवढे सारे करून तरी ही त्यांने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.एकीकडे खावटी तर दुसरीकडे मुलांच्या घरी जाऊन ज्ञानाची शिदोरी देतच होते.कोराना काळात तो देशाचा आधारस्तंभ झाला होता. सतत काहीना काही तो करतच होता.तरी गुरुजी फुकट पगार कसं घेतो.कुणी सांगाल का?
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
शहापूर,जि.ठाणे
9404608836
लहानपणापसून आपला आपल्या शिक्षकांबरोबर फार वेळा सबंध येतो.ब-याच मुलांची शिक्षक होईन असे स्वप्न असते.याचे कारण आपले आयडॉल आपले शिक्षकच असतात.आपले ध्येय तेच असते.अलीकडे मुले,डाॅक्टर, इंजिनिअर, पायलट, आय.टी.क्षेत्रात जाऊन करिअर करण्याचे स्वप्न पहात असतात.कुणी तरी आय.एस.अधिकारी होण्याचे स्वप्न पहात असतो.याचे कारण मोठे झाल्यावर आपले येणारी जगाशी सबंध.त्यामुळे आपण जसे मोठे होतो.तसे आपली स्वप्न बदलतात.
थोडक्यात काय आपल्या विचारांचा आवाका जितका मोठा.तितकीच आपली स्वप्न पण मोठमोठी भरारी घेतात.आपण कोणत्या समाजात वाढतो.?आपले मित्र कोण ?या वरही आपली स्वप्न ठरत असतात.पण आपण ज्या व्यक्तींच्या सहवासत अधिक काळ घालवतो.तेथेही आपली स्वप्न आकार घेत असतात.आपली सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर सुध्दा आपली स्वप्न ठरत असतात.कारण स्वप्नांना आकांक्षांचे पंख हवेत.आणि परिस्थितीचे आकाश हवे.तरच स्वप्न सत्यात उतरतात.अन्याथा स्वप्न स्वप्नच बनून रहातात.स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी एकतर तुम्ही जातीवंत हुशार हवेत,नाहीतर पैशाची जोड तरी हवी.!असे असेल तर स्वप्न लवकर आकाशात भरा-या घेतात.भारताचे माजी महामहीम डाॅक्टर अब्दुल कलाम म्हणतात."स्वप्नही जागेपणी पहायची असतात.तीच खरी स्वप्न.!"आपण दिवसा पहातो ती स्वप्न खरी सत्यात येत असतात.रात्री पहातो ती स्वप्न नव्हेच.त्यामुळे ते विद्यार्थ्यांना स्वप्न पहाण्याचा सल्ला देतात.
वरील माझा विवेचनाचा उद्देश मुलांच्या भावविश्वात शिक्षक नेहमीच घर करून असतात.शिक्षकाला असणारी सामाजिक प्रतिष्ठा.आता इतिहास जमा झाली आहे.तेव्हा तरी होतीच.आलीकडे मात्र सगळ्यांना फुकट आणि खूप पगार घेणारा प्राणी म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते.शिक्षक हा फुकट पगार घेतो.त्याला खूप सुट्या असतात.तो काहीच काम करत नाही.आता समाजात असे काम न करता पगार घेणारे शिक्षक असतीलही; पण फार थोडे चिमूटभर असतील.पण सगळेच तसे नाहीत.खरे पाहिले तर सरकारी शाळेतून बाहेर पडलेलेच सर्वात जास्त प्रशासकीय सेवेत आहेत.मग हे कसे शक्य आहे.त्याचा मूळ पाया याच सरकारी शाळेतील शिक्षकांनीच पक्का केलेला असतो. मग काम करत नाहीत हा लेबल आपण कसा काय लावून मोकळे होतो.?आता सरकारी सर्वच कर्मचारी तेवढ्याच सुट्टय़ा घेतात.जेवढे शिक्षक घेतात.किंबहुना कार्यालयात काम करणा-या कर्मचाऱ्यांला सर्वात जास्त सुट्टयाउपभोगता यातात.सरकारी कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी(यात शिक्षक नाही) कारण शनिवारी शिक्षक काम करतात.शिक्षक दर शनिवारी शाळेत असतात.मग सुट्टय़ा कोण जास्त उपभोग असतो.?
उलट दहावी बारावीचे गणित,विज्ञान यांचे जादा तास घ्यावे,लागतात.स्कॉलरशिप सारख्या परीक्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे,हे कामाव्यतिरिक्त जादा काम शिक्षक करत असतो.हे कुणाला कसे दिसत नाहीत.?
तरी शिक्षकांना का दोष दिला जातो.?कारण आपल्याला दिसतो तो शिक्षक हा एकमेव घटक आहे.जो भ्रष्टाचार न करता काम करतो.दुसरी गोष्ट शहरातून तो ग्रामीण भागात येऊन काम करतो.बाकी सगळ्याच घटकांना शहर खुणावत असते.एकदम दुर्बल घटकाचा आणि त्याचा सहसबंध येत असतो.गरिब पालक आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रेमाने शिक्षणाची शिदोरी देणारा फक्त शिक्षक असतो.आता आपण शहरातून गावात येणारे अजून कर्मचारी पाहू,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य कर्मचारी,आता ग्रामसेवक किती दिवस आणि किती वेळ कार्यालयात असतो विचार करा.तलाठी किती फेरीत आपल्याला भेटतात अनुभवा.बरे ब-याच वेळेस काम करण्यासाठी पैसे लागतात.शिक्षक तुमच्या मुलांकडून किती फी घेतो.सांगा.?कोणती शाळा आठवडाभर बंद असते सांगा?.मग तरी तुमच्या रडारवर गुरुजी का?कारण त्याचा पगार सगळ्यांना माहीत असतो.ग्रामसेवक, तलाठी पगारी नोकर असूनही तुमच्याकडून कामाचे पैसे घेतात.तरी त्याला आपण कधीच पगार विचारत नाही.कारण गुरुजी हाच मुली चेष्टेचा विषय झालाय आलीकडे.
लाॅकडाऊन मुले तर गुरुजी हीट लिस्ट वर आले.कारण सरकारी शाळेतील गुरुजी शिकवत नाहीत.आता सारेच सरकारी कर्मचारी कमी अधिक काम करत होते.कुणी घरी,तर कुणी कार्यालयात.पण पुन्हा सगळ्यांना दिसले ते गुरुजी.याचे सगळ्यात महत्वाचे कारण सरकारी शाळेत विद्यार्थ्यी येतात ते दुर्बल घटकातील.आता सगळ्यांकडे महागडे मोबाईल असतात असे नव्हे.पण खाजगी शाळेतील शिक्षक मात्र शिकवताना दिसले.आता पुन्हा गुरुजीवर आरोप कमी पगाराची माणसं शिकवतात मात्र जास्त पगार घेणारा सरकारी शाळेतील गुरुजी शिकवत नाही.आता खाजगी शाळेतील पालक धनदांडगे असतात घरी दोन तीन महागडे मोबाईल असतात.तेव्हा ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रीया सुरळीत पार पडते.गरिब पालकांकडे इंटरनेटचे रिचार्ज मारायला पैसे नसतात.तेव्हा महागडे मोबाईल कुठूनआणणार?.असले तरी एक दोन कमी अधिक पालकांकडे.त्या प्रमाणात शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.ब-याच सरकारी शाळेतील शिक्षकांनी धोका पत्करून कुणाच्या तरी घरी,कधीच चोरून शाळेत वर्ग घेतल्याचे मी पाहिले आहे.तेव्हा सरसकट शिक्षकाला आरोपीच्या पिंज-यात आपण त्याला उभे करून मोकळे होतो.
शिक्षकांना असणाऱ्या सुट्टया हा सर्वांना चुंगम सारखा चघलत बसायला लावणारा विषय.खरे तर सुटण्याची नियमावली शासन ठरवत असते.शिक्षकांना दीर्घ सुटी असते.तशीच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना एक महिन्याची 'अर्जीत रजा' असते.उलट ते वाटेल तेव्हा ती उपभोगू शकतात.मात्र शिक्षकाला ती सक्तीने मुलांबरोबर घ्यावी लागते.इतर रजाही जवळपास त्याच नियमाने सरकारी कर्मचारी भोगत असतात.जसे महीन्यात दोन शनिवार सरकारी कर्मचारी काम करता पण शिक्षक सर्व शनिवारी काम करतो.तरी गुरुजी कसे काय जास्त रजा उपभोगतात हा संशोधनाचा विषय ठरेल.
बरं गुरुजी शिक्षणात व्यतिरिक्त ही कामे करतो.जे कुणाच्या खिजगणतीत सुध्दा नसते.खिचडी शिजवा,जनगणना,मतदान प्रक्रियेत तर गुरुजी शिवाय तर चाक हलत नाही.शिरगणती,आमुक सर्वेक्षण करा,तमूक माहिती द्या चालू असते.बरं कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत लिपीत वा शिपाई नाहीत तरी सुध्दा सर्व कामे सुरळीत कशी पार पडतात.जरा शाळेत जाऊन गुरुजींचे दफ्तर तरी पहा.मग लक्षात येईल गुरुजी तारेवरची कसरत कशी करतात ते.
संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन असताना आदिवासी विकास विभागाचे शिक्षक गावपाड्यावर जाऊन मुलांना शिकवत होते.दुसरी गोष्ट आदिवासी विभाग मार्फत गरजू दुर्बल घटकातील आदिवासी जातीजमातीच्या लोकांना खावटी वाटपासाठी गावपाड्यावर फिरत होते.प्रथम सर्वे,नंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया,तद्नंतर आधार कार्ड, रेशनकार्ड, गोळा करत गुरुजी फिरत होते.त्यानंतर बॅकेचे अकाऊंट नंबर,माहितीचे संकलन,यासाठी आता पर्यंत गाव पाड्यावर दहापंधरा चक्रा मारत आहेत.आज दोन वर्षांत किती तरी शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन जीव गमवावा लागला आहे.अजूनही शिक्षक खावटी वाटपासाठी फिरत आहेत.शासनाकडून एक छदाम सुध्दा शिक्षकांना मिळाला नाही.कारण एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून तो धडपडत राहिला.पदरमोड करून अजूनही तो भटकतो आहे.कोणत्या खात्यातील कर्मचारी जीवावर उदार होऊन फिरत होते? कोणीही नाही मग गुरुजी पगार फुकट कसा घेतो.कुणी सांगाल का?एवढे सारे करून तरी ही त्यांने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.एकीकडे खावटी तर दुसरीकडे मुलांच्या घरी जाऊन ज्ञानाची शिदोरी देतच होते.कोराना काळात तो देशाचा आधारस्तंभ झाला होता. सतत काहीना काही तो करतच होता.तरी गुरुजी फुकट पगार कसं घेतो.कुणी सांगाल का?
श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
शहापूर,जि.ठाणे
9404608836
शनिवार, २२ जानेवारी, २०२२
आता पंख फुटले
आता पंख फुटले.
तेव्हा रांगत असायची अवतीभवती.
त्यांची काय ती नवनवती.
त्यांच्या खिदळण्याने घर झोपायचे.
आणि रडण्याने घर उठायचे.
आईच्या पदराआड घरभर..
रांगायची चिमुकली पावलं.
आणि आजीचा शब्द
अलगद घ्यायची कानात साठवून.
घराला घरपण होते.
बाईला आई पण होते..
त्यांची पाटी पुस्तके,
वाचायला शिकलं हे घर,
आता काळ सरकला थोडा पुढे.
पिल्लांच्या पंखात बळ आले.
ती उडायला शिकली.
आता बाबा आणि आई
त्यांच्यासाठी कोण कुठले?
कारण पिल्लांना आता पंख फुटले.
प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
रविवार, १८ जुलै, २०२१
मंगळवार, ९ मार्च, २०२१
शृंगार
शृंगार
माझ्या सावित्रीमाईने
लेकी शिकविल्या किती.
तिने लावियेले पंख
तिने दिली त्यांना गती.
लेक इंदिरा लाडकी
तिच्या गळ्यातील मणी
आणि कल्पना चावला
झाली आकाशी दामिणी.
तिच्या किरण बेदीने
वर्दीला आणली शोभा.
झाली डाॅक्टर आनंदी
नारी भरारली नभा.
पोरं लता बहरली
गाणे केले तिने सोने.
घरदार उध्दारले.
मुखी तिचेच तराणे.
पोरी शिकाया लागल्या
बाप झाला बिनघोर.
अन्याय टाकी मान
अत्याचार कमजोर.
पोरी शिकल्या शिकल्या
उजाळले घरदार.
झाली राष्ट्राची प्रगती.
बाई देशाचा शृंगार.
श्री धनाजी जनार्दन बुटेरे
माझ्या सावित्रीमाईने
लेकी शिकविल्या किती.
तिने लावियेले पंख
तिने दिली त्यांना गती.
लेक इंदिरा लाडकी
तिच्या गळ्यातील मणी
आणि कल्पना चावला
झाली आकाशी दामिणी.
तिच्या किरण बेदीने
वर्दीला आणली शोभा.
झाली डाॅक्टर आनंदी
नारी भरारली नभा.
पोरं लता बहरली
गाणे केले तिने सोने.
घरदार उध्दारले.
मुखी तिचेच तराणे.
पोरी शिकाया लागल्या
बाप झाला बिनघोर.
अन्याय टाकी मान
अत्याचार कमजोर.
पोरी शिकल्या शिकल्या
उजाळले घरदार.
झाली राष्ट्राची प्रगती.
बाई देशाचा शृंगार.
श्री धनाजी जनार्दन बुटेरे
शनिवार, १६ जानेवारी, २०२१
"शेतकरी हत्या की आत्महत्या?"
नुकताच एका वृत्तपत्रात शेतकरी आत्महत्येची बातमी वाचली. आणि मन सुन्न झाले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात आकराशे शेतक-यांनी मृत्यूला कवटाळून घेतले.तर सन 2001 पासून तर आज पर्यंत म्हणजे गेल्या 19 वर्षात 16,918 शेतक-यांनी मृत्यूला जवळ केले आहे.हे फक्त विदर्भ व मराठवाडा या दोन प्रदेशात शेतकरी मृत्यूचे हे तांडव सुरू आहे. सरासरी दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूला कवटाळून घेतो आहे. नक्कीच हे चित्र समृद्ध महाराष्ट्राला न शोभनीयच आहे. एकी कडे आमची याने परग्रहावर घिरट्या घालत आहेत. आणि दुसरी कडे मृत्यू शेतक-यांच्या घरावर घिरट्या घालत आहे. भारत विकसित होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.आणि शेतक-याच्या दारावर मृत्यू दस्तक देतो आहे. एकीकडे आस्मानी सकंट त्याच्या समोर आ वासून उभे आहे.कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस. दोन्ही बाजूने तो संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. दुष्काळात दुबार पेरणी, तर कधी हातातोंडासी आलेला घास आतीवृष्टी होऊन हिरावला जातो.विदर्भ व मराठवाडा हा जवळजवळ संपूर्ण शेतीवर आधारित प्रदेश. पिकराई आली की बळीराजाच्या घरात गोकूळ अवतरते.पण दुष्काळात मात्र सारे हरवून जाते.मग उरतो जगाच्या पोशिंद्या समोर पर्याय स्वस्त मरण्याचा.आपण म्हणतो शेतकरी मेला.
राज्यात सरकारे येतात.नि जातात.सत्तेच्या मोहापायी या भाबड्या बळीराजाला कैक आश्वासने देतात.सत्ता आली की सारे मूग गिळून गप्प. एक मात्र खरे आजपावतो विरोधीपक्ष मात्र नेहमी शेतक-यांच्या पाठीशी राहिला आहे. पण सत्ता आली की तेच कालचे विरोधक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसतात. पण शेतकरी का मरतो ?हे आजून तरी कुणी या विषयाच्या मुळाशी जाऊन पाहिले नाही.ना शेतकरी आत्महत्येची गूढ शोधणारी एखादी कमेटी बसली,ना एखादा आयोग आला.फक्त शेतकरी कर्जबाजारीने मेला एवढेच माहीत आहे. शेतक-या आयुष्यात नेहमीच दुष्काळ असतो असं नाही.कधी तरी आबादानी येते.पण एकाच वेळी एकाच प्रदेशातून एकाच प्रकारच्या मालाची इतकी आवक येते ; की शेतमाल कवडीमोल भावाने द्यावा लागतो.नाही तर फेकून तरी द्यावा लागतो.आधीच कर्जबाजारी त्यात मालाला भाव नाही. आणि मग एक दृष्टचक्र त्याच्या वाट्याला येते.आज बाजारात टाॅमेटोचा भाव पाच ते दहा रुपये किलो आहे. मेथी जी महिन्याभरापूर्वी पन्नास रुपये दराने विकली जात होती.ती दहा रुपये दराने विकली जाते.मटार दीडशेच्या दराने विकली जात होती. आज ती वीस ते तीस रुपये दराने विकली जात आहे. बरं हा शेतमाल आपण दलाला मार्फत घेतो.मग विचार करा ? शेतक-याला या पाच रुपयातून किती रुपये मिळाले असतील.कसं त्याने कर्ज फेडावे ? कसं घर साभाळावे की सावरकराचे देणे द्यावे. बर सावरकरांचे नाही दिले की चक्रवाढ दराने पैसे फेडणे आले.पुढच्या वर्षी नक्की पिक येइल की नाही? ते ही सांगता येत नाही.?
भास्कर चंदनशीव यांची एक कथा आहे "तांबडा चिखल " टाॅमेटोची इतकी आवक वाढते की कुणी फुकटपण घेत नाही मग नायक संतापतो. नि टाॅमेटोचा चिखल करतो.तोच हा तांबडा चिखल हा चिखल शेतक-याच्या वाट्याला येतो.जास्त आवक आली म्हणून माल निर्यात करता येतो.पण तशी सुविधा आपणाकडे खेड्यापाड्यात नाही. दुसरी गोष्ट भारतीय शेतमाल युरोपीयन राष्ट्र थेट स्वीकारत नाही. पुन्हा येथे चाचण्या आल्या. कीटकनाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यास युरोप मधे या मालाला बंदी आहे.म्हणजे एक तर शेतक-यांना या विषयी प्रशिक्षण द्यावे लागेल.त्या ही पेक्षासोपा मार्ग म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे शेतक-यांच्या जवळपास निर्माण झाले पाहिजेत.टाॅमेटो साॅस दिडशे किलो.पण टाॅमेटो दहा रुपये.अशी कोणती जादू होते.भांडवलदार शंभरपट नफा कमावतो.आणि शेतकरी जो वर्षभर काबाडकष्ट करतो.त्याला मूळ खर्च सुध्दा मिळत नाही.थोडक्यात शेतमाल शेजारी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे निर्माण झाल्यावर शेतक-याला कोणताच शेतीमाल कवडीमोल किमतीने विकावयास लागणार नाही.किमान राज्य सरकारने शितगृहे उभी करावी. किमान शेतमाल मुंबई दिल्ली चेन्नई यासारख्या महानगरांमधे पाठविण्यासाठी स्वस्तास रेल्वे सेवा. किंवा विमान सेवा.तसं ही कुठे दिसत नाही.मग आवक वाढली की शेतमाल फेकण्यात शिवाय शेतक-याकडे दुसरा पर्याय पण नसतो.
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे.पण येथे शेतमाल दलाल घेतात.जर शेतक-यांना शेतमाल विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले तर थोडा फार पैसा त्याच्या हातात येईल .पण येथे ही सरकारची उदासिनता दिसते.त्यामुळे दलाला मोठे झाले. मागील महिन्यात कांद्याची दोनशेचा आकडा गाठला.पण यात शेतक-यांचे कांदे किती होते. शून्य !:जर हा भाव शेतक-याला मिळाला असता तर नक्कीच तो सुखावला असता; पण येथे दलाला माजले.जर सरकारने शेतक-यांना कांदाचाळीसाठी बीनव्याजी कर्ज किंवा काही अनुदान दिले तर कांदा कवडीमोल दराने विकण्यापेक्षा तो कांदा चाळीत जाईल.नि बळीराजा सुखावेल.
लग्न परंपरा ही एक शेतकरी आत्महत्येचे कारण आहे. त्यात मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो.कायद्याने हा गुन्हा आहे.पण हाच गुन्हा महाराष्ट्रातील कितेक आईवडील बीनदिक्कत करतात.तसा गुन्हा आपण केला आहे हे ना नवरा वा नवरी मुलीच्या नातेवाईकांना वाटत असते. लग्न समारंभात केला जाणार प्रचंड खर्च गरीब शेतक-याच्या जीवावर उठतो.मुलीचे लग्न आहे.म्हणून जास्त शेती कसळायला घेतली जाते.बी बियाणे, खत,मशागत,यंत्र सामग्री, या वर खर्च केला जातो.निसर्गाने जर धोका दिला की सर्व आकांक्षावर पाणी फेरले जाते. आणि गरीब मुलीचा बाप स्वतः जगण्याच्या लायक समगत नाही. जर आली तर सरकारी मदत येईल कदाचित त्या पैशातून लेकीचे लग्न होईल या आशेवर गरीब शेतकरी स्वतःच स्वतः पणाला लावतो.आणि या जगाचा निरोप घेतो.
काही ही असो पैसा हा शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे.कर्जमाफी यावर उपाय होऊ शकत नाही. त्यापेक्षा सरकारने शेतकरी बॅक काढून. शेतक-यांना दीर्घ मुदतीची काही लाख रुपयांची कर्जमाफी दिले.तर बराच फरक पडेल.बरेच शेतकरी बांधव.मरणापासून वाचतील.कारण सरकार कोटी कोटी प्रकल्पासाठी खर्च करतो.तर हा शेतकरी वाचवण्याचाही प्रकल्प हाती घ्यावा ही मायबाप सरकारला विनंती. नाही तर शेतकरी आत्महत्या नसून त्या हत्याच ठरतील.
प्रा.श्री धनाजी जनार्दन बुटेरे
शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०
भुईआकाश
भुई
क्षितीजाने एकदा
भुईला म्हटले.
तू किती छान आहेस.
भुई म्हणाली क्षितीजाला
तू तर फुललेलं रान आहेस.
तेव्हा पासून क्षितीज
धरणीची आस ठेवून जगतो.
धरती एकदा मिठीत घेईल
ध्यास घेऊन जगतो.
कधी धरती साथ देईल
म्हणून क्षितीज निढळावर
ठेवून आहे हात.
धरेने निसंकोच
फुलून घ्यावे अंतराळात.
धनाजी बुटेरे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)