💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
*"पत्रामधली पाऊस"*
तुझं पत्र आलं की
पाऊस ही येतो.
डोळ्यांतील आख्खा गांव
भिजून चिंब होतो. ॥
गतकाळाच्या खुणा घेऊन
आठवणी येतात धाऊन.
पत्रामधली गुलाबी अक्षरे
ती ही जातात वाहून. ॥
पत्रामधले शब्द बिलोरी
करतात मनात घर.
मन सारे तरसून जाते
आभाळ भरते वर ॥
डोळ्यामधील चिंब वाटा
रस्ते होतात धुसर.
पुस्तकांतील मोरपिसाचा
तुला पडला विसर ॥
किती सरली वर्ष सखे
पत्र नाही आले.
पाऊस नेहमी येतो.
माझं गाव करतो ओले॥
पाऊस फितूर झाला
तुला मिठीत नाही घेत.
किती वर्षे सरली सखे
आठवण नाही येत? ॥
✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
💚💚💜💜💜💙💙💙💜💚💙
💚💚💜💜💜💙💙💙💜💚💙
💚💚💜💜💜💙💙💙💜💚💙
प्रेम कविता हळूवार मनाचे भाव
प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
सोमवार, ५ डिसेंबर, २०१६
प्रेम कविता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
या कवितेला कविता नेटवर्क या समूहावर प्रथम क्रमांक मिळाला
उत्तर द्याहटवा