कवी श्री धनाजी जनार्दन बुटेरे आपले शब्दांचा गुलमोहर अनुदिनी वर आपले स्वागत करीत आहे सर्व कविता, लेख, कथा याचे स्वामीत्व हक्क राखून ठेवले आहेत.

मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

जनमत वृत्तपत्रातील बातमी

कवी धनाजी बुटेरे गुणीजन पुरस्काराचे सन्मानित

शहापूर दि.23/ नुकताच शहापूर येथे भव्य कुणबी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कुणबी समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या कुणबीबांधवांचा विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यामध्ये कवी व प्राध्यापक श्री धनाजी जनार्दन बुटेरे यांना.कुणबी गुणीजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी धनाजी बुटेरे हे उत्तम कवी असून त्यांना महाराष्ट्रातील साहित्य लेखनासाठी चे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्याचा "पळसबहर "हा कविता संग्रह प्रकाशित आहे.विविध वृत्तपत्रात दिवाळी अंकात त्याचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून त्याचे कविता वाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. तसेच मुंबई दूरदर्शन केंद्रावर सुध्दा काही कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. 17 डिसेंबर रोजी एकता कल्चर संस्थेच्या वतीने त्याना पुरस्कार देण्यात आला त्या पाठोपाठ रोजी शिक्षकांच्या काव्यवाचनाचे स्पर्धेत त्यांना. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाला आहे. ते कथा कविता ललित लेख .या विषयावर लिखाण करतात. आता पर्यंत त्यांनी एक हजारापेक्षा जास्त दर्जेदार कवितांचे लेखन केले आहे.

रंगहिन (मराठी कविता )


💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💛💛💛💛💛💛💛💛💛💛

*रंगहीन सारे*

दुष्काळाचा झंझावाता
घोंघावत आला.
गर्द काळा रंग माझ्या
आयुष्यचा झाला.॥

हिरवाई रुसून गेली
हिरवा चुडा फुटला.
आयुष्यातून हिरवा रंग
कुणी बरं लुटला.॥

पाऊस  फितूर झाला.
तो नाहक बळी गेला.
कफनाचा पांढरा रंग
आयुष्यास माझ्या आला. ॥

जळते मी एकटी
भोवती लाल निखारे.
चटक्यांची वेदना
केवळ दुःख सारे.॥

काल झाली पिवळी
पांढरे उखळ सारे.
रंगहिन आयुष्य
अश्रू निथळणारे.॥

      *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
            पोई ; कल्याण ; ठाणे
                     *अध्यक्ष*
        महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण)
        djbutere@blogspot.com
                 18/12 /16
                Copyright

💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
              

दंगामस्ती कविता


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

*दंगामस्ती*

आकाशाच्या अंगणात,
खुशाल मोकळे फिरू.
झाडे वेली रानपाखरे
दंगा मस्ती करू.॥

नकोच शाळा आणि पुस्तक
दफ्तर पाटी खडू
खुशाल सरसर खारू सारखे
झाडावरती चढू.॥

हवी कशाल मोटरगाडी
तकलादू बाहुला
फांदीवरती खुशाल बांधू
झाडावरती झुरला.॥

कशास कृत्रीम पाऊसपाणी
भिर्रभिर्रणारे झरे.
माशासारखी डुबकी मारू
सखे साजणी गडे.॥

        *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
             पोई ; कल्याण ; ठाणे
                     *अध्यक्ष*
         महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण)
         djbutere@blogspot.com

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

              

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

आक्रोश( कविता )

*आक्रोश*

आक्रोश आक्रोश
आक्रोशते नारी.
हुंड्या परी ती
स्मशान दारी. ॥

पाय झाले जड
देऊळ तुटले
पायी जडे बेडी
आभाळ फाटले.॥

आटलेत आसू
कशी कशी रडू
सजले सरान
किती किती मूढ

हापापले वैरी
मांडला हा डाव
वर्मी  हा रुतला
काळजात घाव ॥

जळते लेकरू
आपराध काय?
बाधली ही गाय
कसाबाच्या दारी॥

आक्रोश आक्रोश
कंठच दाटला.
रडावे कसे गा.
आभाळ आटला.॥

      *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
            पोई ; कल्याण ; ठाणे
                     *अध्यक्ष*
        महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण)
        djbutere@blogspot.com
21/12/16
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜

पानगळ कविता

*मनाची पानगळ*

मन रानचं पाखरू
घडी घडी भरारते
मन शेत शिवारात
अंग अंग शहारते ॥

मन खोलवर डोह
त्यात तरंग आफाट
मन निळसर झाडी
मन चिंबचिब वाट.॥

मन नाद पावसाचा
मोरपंखी पानावर
मन करते गारूड
मोहरल्या रानावर.॥

मन पाखरांची गाणी
मन धुंद धुंद होई
मन दुष्काळग्रस्त
मन करपून जाई.॥

मन फुलांचा सुगंध
मन मोहरून जाई.
मन एकटं एकटं
मन पानगळ होई.॥

  ✒ *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
            पोई ; कल्याण ; ठाणे
                     *अध्यक्ष*
        महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण)
        djbutere@blogspot.com
              
          

माझ्यातल कवी. कविता

माझ्यातला कवी

कधी झ-यातून वाही
कधी पाण्यातून येई.
माझ्यातला कवी.
घोट कवितेचे घेई.॥

थेंब पावसाचा झरे.
झाडाझाडात मढे.
माझ्यातला कवी.
शब्दाशब्दातून घडे.॥

अश्रुंचा फुटे बांध.
कधी रुसलेला चाॅद.
माझ्यातला कवी .
शब्दांत लावी सांध ॥

रान लेई नवासाज.
चढे झाडात उन्माद
. माझ्यातला कवी .
कवितेला घाली साद.॥

कुठे शेतकरी मरे.
कुठे आटलेत झरे .
माझ्यातला कवी .
शब्दा शब्दातून रडे.॥

✒ प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
              पोई ; कल्याण ; ठाणे
                    अध्यक्ष
       महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
            (कल्याण ग्रामीण)
     djbutere@blogspot.com
                   21/13/16
           Copyright

लात मारीन तेथे पाणी काढीन

"लाथ मारीन तिथे पाणी काढीन"

                  अशी एक म्हण मराठी भाषेत आहे. ती तंतोतंत लागू होते. ती माझ्या स्वर्गीय पं.पू वडिलांना. आम्ही एकूण तीस भावंडे.मी सगळंयात छोटा. मी दहा वर्षाचा असताना वडील आम्हाला या जगात सोडून गेले.पण त्यानी जे आमच्या वर संस्कार केले. त्यामुळे जीवन सुंदर झाले.बाबांचा आणि माझा सहवास फक्त दहा वर्षाचा त्यातील तीन चार वर्षे माझ्या बालपणात गेली.तीन वर्षे बाबा अंथरुणावर खिळले होते.उरलेले तीन चार वर्षे इतकाच काय तो सहवास. यात जे आठवणींचे मोती हाती लागले. ते आज मी तुम्हाला उलगडूने दाखवितो.
             बाबांचा स्वभाव करारी होता. शिस्तीचे बाबा भोगते होते.घरात बाबांचा दरारा होता.बाबा घरात आले की घरात स्मशान शांतता असे.ते घरात शिरले की घराघरात चिंडीचिप असे.दिवे लागले की हातपाय धुऊन अभ्यासाला बसावे लागे.अभ्यासाच्या बाबतीत बाबा खूप सजग होते.हा दंडक होता. शिस्तीचे ते भोक्ते होते.त्यांचा मार म्हणजे कल्पना सुध्दा केली जाऊ शकत नाही. कर्तबगार पुरूष म्हणून आख्खे गाव बाबांच्याकडे पहात होते. बाबांचे बाबा म्हणजे माझे अजोबा लवकर वारल्या मुळे बाबांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. बाबांना तीन भाऊ एक बहीण,बरोबर विधवा आई या सर्वांची जबाबदारी येऊन पडली.पण बाबा डगमगले नाही. चार छोट्या भावंडांना सोबत घेऊन त्यांनी. घरदार नावारूपाला आणले.माझे बाबा साधे शेतकरी होते.जमिनीवर पाच दहा एकर ती पण पावसावार् आधारीत. म्हणजे पावसाच्या पाण्यावर पिकणारी भात शेती. दुसरे उत्पन्नाचे कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे बाबा कायम काबाडकष्ट करायचे. कष्ट आणि बाबा हे सूत्र होतं.वर्षभर बाबा राबराब राबायचे आलेल्या पैशातून भावंडांना शिक्षण कपडालत्ता,पाहूणे राहूले.भेटीगाठी, सणउत्सवा केले जायचे.या सर्वच गोष्टी साठी पैसा शेतातून पिकणार्या भातविकून यायचा घरात फरफट व्हायची पण बाबा ते लिलया पेलायचे त्या मुळे बाबांनी गावाजवळ आमचं शेत होतं त्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला चौघे भाऊ काही मजूर लावून विहीर पंचवीस तीस फूट खोदली.कष्टाचे चीज झाले.विहीरीला पाणी लागले.तो दिवस आनंदात गेला तीर्थ म्हणून सर्व पाणी प्यायले.घरात गोडधोड केले होते.आनंदउत्सव साजरा झाला.बाबांनी त्या विहिरीच्या पाण्यावर भर उन्हात शेती फुलविली.शेती मधे बाबांचा हात धरील असा माणूस गावात कोणी नव्हता. जे पण ते शेतात पिकवायचे ते भरघोष .त्यांच्या हातात जादू होती. नव्हे हाताला परीस होता.ते सोनं पिकवायचे. कुटुंबाचा खरी आथिर्क स्थैर्य माझ्या बाबांनी मिळवून दिले. बाबा शेती मधे वेगवेगळे प्रयोग करायचे असाच प्रयोग त्यांनी वांग्याच्या शेतीवर केला.आणि वांगी कशी पिकवावी हे बाबांनी गावाला दाखवून दिले. एक एकरात बाबा रोज हजार किलो चे पिक घेत.पण वाहतुकीच्या सुविधा अभावी. माल बाजारात पोहचवण्यासाठी खूप खर्च यायचा त्यामुळे निव्वळ उत्पन्न कमी व्हायचे. पण बाबा मुळेच गावातील काही माणसांना रोजगार मिळायला लागला.कारण वांग्याचे बोजे करून ते बाजुच्या गावात नेण्यासाठी माणसं लागायची. बाबा गावातील गरीब बापड्यांना पैसे देवून ते करून घेत.ही माणसे दोन तीन चक्कर मारत त्या मुळे त्यांना जास्त पैसे मिळत.याच वांग्याच्या शेतीतून वडिलांनी एक एकरात शेती घेतली.
            भावंडांना शिकवले. शिक्षणा विषयी फार सकारात्मक होते. आपली भावंडं शिकावी म्हणून ते आग्रही होते. त्यामुळे माझ्या दोन्ही काकांना दहा किलोमीटर चालत शाळेत पाठवत कारण बसची सुविधा नव्हती. माझे काका एवढ्या दूर जायला. तयार नसायचे त्यामुळे ते शाळेत न जाता बाहेर कुठे तरी भटकंती करून यायचे.शाळेत दांडी मारायचे. वडिलांना हे समजल्यावर ते काकांना खूप मारायचे. बाबांचा मार खूप वाईट आसायचा.जे हातात येईल त्याने ते झोडून काढायचे.बाबा मारायला लागले की सोडवायचा कुणी प्रयत्न पण करत नसे कारण बाबांचा राग सगळ्यांना माहित होता.तो दशकात ऐंशी चा होता.या वेळी सुध्दा बाबांनी एका काकाला तंत्रशिक्षण घेण्यासाठी गावापासून पंधरा किलोमीटर दूर अंबरनाथ या ठिकाणी पायी पाठवत होते.त्या काळात सुध्दा. पुढील परिस्थितीची जाणीव होती. जगात तरून जायचे असेल तर शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे त्यानी ओळखले होतं. ते काकांच्या साठी धडपडत ते आपल्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीत दूर कसे रहातील.वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी माझ्या मोठ्या भावाला गावापासून दूर दहा किलोमीटर शाळेत टाकले होते. गावात इतर मुले पाचवीत नंतर शाळा सोडून देत कारण गावातील पासून शाळा दहा किलोमीटर होती. त्यात सकाळची शाळा म्हणजे सात वाजता पोहचावे लागे.म्हणजे घरातून पहाटे साडेचार वाजता.भावाला घरातून पहाटे निघावे लागे.आशा परीस्थिती सुध्दा ते कधीच कोणताही विचार न करता.भावाला शाळेत दर पाठवत राहिले. कधी कधी ते स्वतः भावांबरोबर काही किलोमीटर पायी चालत जात असत.आणि पुन्हां माघारी येत असत पण ते विचारा पासून कधी ढळले नाही. आमचे एकूण आठरा माणसांचे कुटुंब होते. पण कधीच काही कमी पडले नाही. त्याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते.
            वडिलांचा जनसंपर्क दांडगोबा होता. कुणापुढे त्यांनी शब्द टाकला तर तो शब्द ब्राह्म शब्द ठरायचा.त्यानी मित्र फार जमविले.ते सर्वच आम्हाला त्यांच्या पश्चात उपयोगी पडले.बाबा गावचे उत्तम पुढारीत होते. गावात त्यांच्या शब्दाला आदर होता. सगळ्यात महत्वाचे की आमच्या गावात जाती भेद फार मानला जायचा.माझे चुलत आजोबा तर एकदम कर्मठ होते. पण माझे बाबा आगदी वेगळे.ते जातीभेद मानत नसत एक गाव एक पाणवठा हे आमच्या बाबा चे विचार. पुढे ते प्रत्यक्षात आले.त्यांच्या मित्रांच्या यादी सर्वच जातीची माणसं होती. आदिवासी,दलित ,सर्वच माणसं बाबांनी जपली. आजून बाबा खूपच धार्मिक होते. ते उपास तापास करत उपास खूप कडक. ते व्रतस्थ असले की जेवायला बसले की कुणीही बोलले, झाडू मारणे,बांगड्या वाजणे,कुत्रा भुंकणे, ही कोणतीही घटना घडली की ते जेवण सोडून उठत हे सारे ये "शीवसरोदय"या ग्रंथातील सूचना पाळत त्याना शीवसरोदय चांगला माहित होते. बाबा चांगले अभिनेते होते. आमच्या गावाला एक चांगली नाट्यपंरंपरा आहे. 1960 पासून हनुमान जयंती या दिवशी. पालखी सोहळा असतो. दुसर्या दिवशी एक ऐतिहासिक नाटक गावातील नाट्य मंडळ सादर करीत .या नाटकात एक स्त्री पात्र असते.स्त्री पात्र पुरुष साकारतो.बाबांनी तीन चार नाटकात भूमिका साकारल्या त्या मध्ये सह्याद्रीचा सिंह, जाग मराठ्यांनी जाग,जावळीचा झंझार.ही काही नाटके मला आठवतात.बाबांनी. धनाजी, बहीर्जी,या भूमिका साकारल्या. मी चौथीत असताना बाबा आजारी पडले.दिवसेंदिवस आजार बळावत गेला.पण निदान झाले नाही. बाबा माळकरी होते म्हणजे शुद्ध शाकाहारी डाॅक्टर सांगत की मटन मच्छी खा तर ताकत येईल इंजेक्शन गोळ्या योग्य काम करतील.पण मेलो तरी चालेल पण आता मासाआहार करणार नाही . बाबा खरे खुरे वारकरी होते. हा पहाडा सारखा पुरुष आता मात्र हादरून गेला.बाबांना आपला मृत्यू दिसू लागला. माझी पत्नी मुले यांचे काय होणार याची चिंता त्यांचे मन नेहमी आम्हा मुलांसाठी तडफडायचा.घायाळ पक्षाला आपल्या पिल्लाची चिंता जशी सतावते.तशी वडिलांची अवस्था झाली होती. नुकतेच आमचे आठरा माणसांचे कुटुंब विभक्त झाले होते.कुटुंब विभक्त होऊन वर्ष दीड वर्ष उलटला असेल.बाबांनी आंथरून धरले होते.या वेळी सगळ्यात मोठा आधार माझ्या आईने दिला ती खंबीर पणे संकटाचा सामना करत होती.यावेळी सर्वच पैसे बाबांनी काटकसर करून ठेवलेले पैसे संपून गेले. अशा वेळी बाबांनी जमवलेला मित्र परिवार कामी आला पन्नास शंभर जी होईल ते ते देत होते. पण कुणी ही कधीच परत मागितले नाही. आईचे दागीने ही विकून टाकले. मुंबई चे सर्वच सरकारी रुग्णालये पालथी घालून झाली होती. भगतसिंह दोरे गंडणे मंत्रतंत्र. जादूटोणे सर्व करून झाले .पण नियतीच्या मनात वेगळे होते. बाबा आजारी असतांना मी बाबांच्या कायम जवळ असायचोला या दहा वर्षात सुध्दा पुष्कळ कळत होते. मी बाबांची खूप सेवा केली. त्याचे पाय चेप माॅलीश कर पाण्याच्या बासरीने अंग शेकव .मलाही कळले होते बाबा आता थोड्याच दिवसाचे पाहूणे आहेत. बाबा मला अंथरुणात पडल्या पडल्या नेहमी सांगत आता मी जगणार नाही पण मी गेल्यावर शाळेत जाऊन शाळा सोडू नकोस. मोठा साहेब हो.तो बाबांचा सल्ला नव्हता तो आशीर्वाद होता. मी सारखा चिंता करत बसायचो.बाबा गेल्यावर आपले काय? आणि एक दिवस अचानक बाबा आपली तीन चिल्ली पिल्लाची सोडून दूर च्या प्रवासाला गेले. आम्हाला पोरके करून.
✒श्री धनाजी जनार्दन बुटेरे
           पोई कल्याण ठाणे
            📞9930003930
                  Copyright

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

मराठी कविता "गुस्ताॅखी"

💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काव्य स्पर्धेसाठी अधुरी कहाणी

*या मैफलीत*

मेघ दाटले आभाळी
ऊरी आठवांचा पूर
सखी वादळ होऊन
गेली माजून काहूर. ॥

किती उलघाल मनाची
लागे टांगणीला जीव.
नाही नशिबाला वाटली
उलू उलूशीच कीव.॥

सखे आठव पाऊस
त्या वादळाच्या वाटा.
घराघराचा उंबरा ;
करी आपुला बोभाटा. ॥

सखे रुसलेत सारे,
पायवाटा झाल्या बंद
तुला आठवतो सखे
हाच नाद एक छंद. ॥

तू गेलीस निघून
मी भिजतो बाहेर.
सखे कर ना जवळ
एकदा तरी माहेर ॥

फक्त एकदा पाहू दे
डोळा भरून साजणी
नाही करणार गुस्ताॅखी
माझ्या दिलाच्या मैत्रिंणी॥

सखे नाही आता येत
ऐकू पाखरांची गाणी.
रंगलेल्या मैफलीत
एक आधुरी कहाणी.॥

✒ *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
पोई ; कल्याण ; ठाणे
*अध्यक्ष*
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
(कल्याण ग्रामीण)
djbutere@blogspot.com

💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💜💜💜💜💜💜💜💜💜💜💜🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे


मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

कथा "दिल दोस्ती "

                              राणी सुंदरतेचे दुसरे नाव होतं.बावनकशीसोनं .सगळ्यात मोठी मुलगी. आईची बाबांची लाडकी वयात आलेली पोर. राणी दिसायला सुंदर ,सरळ नाक, बादामी ओठ,गोबरे गाल,पाहणारे पाहातच रहात. नखशिखांत सुंदर अशी राणी. तिच्या सौंदर्यावर नभाळणारा तरूण विरळाच. दहावी झाली नि काॅलेजात जाऊ लागली. पहिल्याच नजरेत किती घायाळ झाले.गणित नाही. घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी. विशेष मजा मस्तीवर मुरड बसायची. सारे कसे आबादी आबाद होते. काॅलेजात दिवस आनंदाचे सरत होते. म्हणता म्हणता.एक वर्षे कसे गेले ते कळलच नाही. जसे तिचे काॅलेज मध्ये चाहते होते. तसे आपल्या शेजारी पण होते. असाच तिच्या शेजारी राहणारा राहुल तिच्या प्रेमात पडला.तसा तिला ही राहुल खूप आवडला लागला.सुरुवातीला बोलणे, मग भेटणे, मग काहीतरी निमित्त करून बाहेर भेटणे. दोघे एकमेकांची कधी झाले.ते दोघांना ही कळले नाही. त्या दिवशी घरात कुणीच नव्हते. अचानक राहूल आला.आज प्रथमच ते एवढ्या एकांतात भेटले. आणि प्रथमच ती त्याच्या उबदार मिठीत किती तरी वेळ विसावली. मग आनाभाका झाल्या.लग्नाचा विषय निघाला. पण ते शक्य नव्हते कारण गरीब श्रीमंतीची दरी खूप मोठी होती.राहूल बड्या बापाची औलाद तर राणी गरीबा घरची लेक,काही असलं तरी प्रेम आंधळे असते. म्हणून एकमेकांची झाली होती. एकमेकांवर प्रेमाची उधळण करत होते. आज आई बाबा घरात नव्हते. राणीने लहान मुलांकडे निरोप पाठवून राहूलला बोलावून घेतले. प्रेमाच्या गूजगोष्टी झाल्या. एकमेकांच्या मिठीत दोघ विसावली .राहूल ने न राहून विषय काढला " राणी आतां आपण कमी भेटणार आहोत " " का बर ?" " मला शिकण्यासाठी बाबा बाहेर गावी पाठवणार आहेत ". "मग " ? उदासपणे राणी म्हणाली " मग काही नाही " राहूल म्हणाला. "तुझं ही लग्न होणार आहे. ?" मला आशी भेट दे मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही.राहूल बोलला शब्दाचा मतीतार्थ राणीच्या ही लक्षात आला .दोन जीव एक झाले. दोन्र जीव धुंद झाले .ना कशाची पर्वा ना डर होता आतमध्ये प्रेमाचा मोहर होता. दोघं ब-याचवेळाने भाणावर आले. मिठी सैल झाली.घडू नये असं घडलं होतं.किती तरी दिवस राणी या स्वर्गीय सुखाच्या आठवणीत स्वार व्हायची.राहूल शिक्षणासाठी बाहेर गावी गेला होता. कधी तरी भेट व्हायची पण पूर्वी सारखी नाही. म्हणता म्हणता प्रेम विरळ होत गेले म्हणातात "प्रेम टिकवायचे असेल तर मनाला मनं घासावी लागतात. नाही तर प्रेमाला पण गंज चढतो.यांच्या बाबतीत ही असेच झाले होते. आता दोघे ही एकमेकांना विसरली होती.प्रेम आठवण होऊन डोळ्यात तरळत होते. दरम्यान संजय नावाचा एक चेहरा तिला आवडू लागला होता. दोष तिचा नव्हता. प्रेम तिला साद घालायचं.प्रेम तिच्याशी क्षण क्षण बोलायचं. तिला खुणावत होते तिचे प्रेम. शेवटी ती ही त्याची झाली तेतिचे तिलाच कळलं नाही. आता ह्रदयी संजय रहात होता. स्त्रीयांचे ह्रदय मेणाचे असते ते लवकर विरघळून जाते. ती आता संजय ची होती. भेट गावा बाहेर ओढ्यावर होऊ लागल्या भेटी वाढल्या एकांतात ती एकमेकांच्या मिठीत विसावू लागली. मन जुळली बरोबर शरीर ही.राणी चे शरीरसुख त्याचे वेसन झालं प्रेम न रहाता. राणी म्हणजे शरीरसुख देणारी. सुखवस्तू झाली होती. प्रेम एक वेगळ्या वळणावर पोहचले होते. राणी मनोमन दोघांवर प्रेम करायची दोघांपैकी जीवनात तीला कोणीही जोडीदार चालला असता.पण राहूल तीला जास्त हवासा वाटायचा. कारण कोणताही पदार्थ जास्त खाल्ला तर त्याची तृप्ती येते संजय ची तिला तृप्ती आली होती. राहूल नुसता चाखला होता. तो आजून हवा वाटायचा. दरम्यान आईला थोडी कुणकूण लागली. गांवात चर्चा होऊ लागली. "मुलगी म्हणजे काचेचे भांडे ".म्हणून घाईघाईने लग्नाचा निर्णय झाला.मुलाचा शोध सुरू झाला. मुलगी सुंदर मग मुलांची काय कमी? घरची गरीबी असली तरी मुलगी म्हणजे सौंदर्याची खाणच.पहाता पहाता एक अनुरूप मुलगा बघून लग्न पक्के झाले. मुलगा दिसायला साधारण, तो ही गरीब फक्त कर्तबगार होता. वयाने मुली पेक्षा खूप मोठा, राणी ला तो पसंत नव्हताच पण आईपुढे शहाणपण चालेना.मग गुमान नशीबात पुढे मान तुकवण्यावाचून गत्यंतर नव्हते. योगायोग पहा तिच्या नव-याचे नाव ही राहूल . एवढ्या एकच समाधान देणारा क्षण तिच्या वाट्याला नियतीने दिला होता. राहूल चे प्रेम गाडले गेले होते. प्रेमाची कबर तिच्या ह्रदयत कायमची बांधली होती. पण राहूल आता जीवंत झाला होता. ज्याला सर्वस्व अर्पण केले ते पाहिले प्रेम नावाने का होईना जीवंत राहणार होते. मनापासून एखाद्यावर प्रेम केले तर ते प्रेम पुन्हा मिळतेय याचा प्रत्यय देणारा क्षण तीच्या पुढे उभा होता. आयुष्यात राहूल नव्हता पण नाव मात्र तिच्या नावापुढे लागलं होत.नशीबाने थोडी सात दिली होती. तसा संजय नांव ही तिला चाललं असते कारण संजय ने ऐण तारुण्यात तिची तृष्णा भागविली होती. आणि ऐण तारुण्यातील सांगाती तुला यापुढे ही हवा होता. पण नियती पुढे आपलं चालत नाही. नियती आपले स्वतःचे ऐकते. लग्न झालं नि " मधूचंद्रा" चा दिवस उजाडला. तिचा नवरा मात्र खूप खूष होता. आपल्याला सुंदर सोज्वळ पत्नी मिळाली याचा त्याला गर्व वाटायचा. तिला खूप सुखी ठेवू. असे त्याला मनोमन वाटे.पण राणी त्याला उदास वाटली.मधूचंद्रासाठी ते बाहेर गावी गेले उद्देश दोघांना एकांत मिळावा हा होता. एकदुस-यांना समजून घेता यावे. "मधूचंद्र" म्हणजे चैतन्य देणारी गोष्ट. आयुष्यांतील एक सुंदर क्षण असा क्षण जो डोळ्यांत साठवून ह्रदयात जपावं .असा सोनेरी क्षण, आयुष्यभर आठवत रहातो. तो सुखद गारवा देणारा क्षण. पती दूर असताना त्याच्या सहवासाची मधुर साक्ष देणारा अविस्मरणीय क्षण. पती घरात नसताना त्याच्या अस्तित्वाचा पारिजात बहरणारा क्षण. पण अशा या चैतन्याचा झरा बहराच्या वेळी ती स्वतः ला हरवून बसली होती. गप्पा झाल्या, चर्चा झाली. पण ती हरवलेलीच होती. रात्र झाली. आणि तो भारावून टाकणार क्षण आला. यावेळी आकारातील वीजा दोघांच्या नसानसात धावतात.जगात फक्त नि फक्त ती दोघेच असतात. काही क्षणांसाठी ती या विश्वातून वजा होतात. यावेळी ती दोघे अलौकिक जगात फिरत असतात. पण तिच्या बाबतीत असं काहीच घडवलं नाही. कारण जे क्षण पतीसाठी राखून ठेवायचे ते तीने दुसर्यावर उधळले होते.त्याला चुकल्यासारखं वाटलं आपण "बलात्कार " केला असं त्याला वाटू लागले.लक्षात ठेवावा असा एक ही क्षण त्याच्याकडे नव्हता. काय समजायचं तो ते समजला. त्याने तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. " राणी मी तुला आवडतो. "? हो ,न आवडायला काय झाले . मग हरवलेले का वाटते ?. आपलं घर सोडल्यावर दुःख होतच ना. हे तात्विक उत्तराचा रोख भाबड्या पतीच्या लक्षात नाही आलं.पुढे अशीच गप्पा चालू राहील्या बोलता बोलता कधी डोळा लागला हे राहूल च्या लक्षातपण आले नाही. म्हणता म्हणता चारपाच महिने उलटले.या चारपाच महिन्यात राणीवर असंख्य बलात्कार झाले. यात राहूल चा दोष काहीच नव्हता. पण नियतीची शिकार तो झाला होता. राणी वर लग्न लादले होते. तिला जोडिदार म्हणून प्रियकर राहूल हवा होता. किंवा निखळ सुखाची बरसात देणारा संजय हवा होता. तिला हा राहूल आवडतच नव्हता. वयाने मोठा, दिसायला जेमतेम, ना पैसा ना संपत्ती, ना घर. काय होते या राहूल कडे .तिने चुकूनही त्याच्यावर प्रेम केले नसते.पण आईच्या हवास ची ती शिकार ठरली. प्रेम हे झर्या च्या पाण्यासारखं अलगद जमिनीच्या कुशीतून वर यावे लागते.पण येथे झराच आटला होता. राहूल ने सारे मनात ठेवले. ती फक्त मनात कुढत होती. आता पर्यंत एका ही क्षणांसाठी या राहूल ची झाली नाही. हळूहळू दोघांमधे प्रेमाची दरी वाढत गेली. त्याचा ही तोल सुटू लागला. आता शाब्दिक चकमकी झाडू लागल्या. कोणतेही छोटेसे कारण त्यांना भांडण करायला पुरेसे असायचं. बिचारा राहूल प्रेम ही मिळाले नाही, ना शरीरसुख. तो या बाबतीत कमनशिबी ठरला. ती प्रेमभंगाचा राग पती वर काढू लागली. खोटे आरोप नवर्यावर करू लागली. प्रकरण सासूबाई कडे गेले. तिनेही दुर्लक्ष केले. आपल्या मुलीच्या वाईट सवयी तिला ही माहित होत्या. पण " झाकली मूठ सव्वा लाखाची "म्हणून वरवर मखलाशी केली.मुलीला समजावले. पण थोड्याच दिवसात" ये रे माझ्या मागल्या. " वाद वाढत गेले. " तू माझे समाधान करू शकत नाही ".या एका शब्दाने नात्यात भयानक कटुता आणली .राहूल ला आठवलं "राहूल त्या शब्दाचा अर्थ शोधू लागला. " म्हणजे तिला आपण "शंढ" वाटलो काय? तो वेगवेगळे अर्थ लावू लागला. या शब्दाने भांडण पेटले. संजय आणि राहूल या दोन तरूणांनी तिच्या मनावर गारूड घातलं होते. ना ती संजय ला विसरू पहात होती ना राहूल या प्रियकराला. ऐन तारुण्यात ज्यांनी सुखाची बरसात केली त्या राजस प्रियकराला कसं विसरायचं? ती स्वतः हरवून जायची ते धुंद करणारे क्षण आठवायची त्या तारुण्याच्या लहरीवर स्वर व्हायची. पतीची मिठी कधी तरी संजयची वाटायची .ओढ्याकाठी ती स्वतः च संजय ला मिठीत घायची.संजय तिच्या मिठीत रममाण व्हायचा.राहूललाही तिच कवेत घ्यायची. राहूल ला पहिली मिठी पडली ती राणीची.मात्र या राहूलला कधी चुकूनही कवटाळले नाही. हा राहूल म्हणजे " बलात्कारी पुरूष अशीच तिची धारणा होती. कारण हा फक्त नि फक्त बलात्कारसाठीच जवळ येतो. बाकी कधी ढुंकूनही आपल्या कडे पहात नाही. त्याने तिच्याकडे यावे बोलावे असे होते का तरी. त्याला ही ती फक्त सुख घ्यायची ती सुखवस्तू वाटू लागली. आता नात्यात भलताच दुरावा निर्माण झाला होता. राणी त्याला नको वाटायला लागली. आपणांस ही स्त्री कधीच सुखी ठेवणार नाही. रोजरोजच्या भांडणाला तो आता कंटाळून गेला होता. काय करावे त्याला कळत नव्हतं. आपण फक्त हिला ओरबाडून घेतो असं हिला वाटते. जगण्यासाठी माणसाला शरीर सुख लागतेच पण त्याबरोबर आपुलकीने केसातून हात फिरवणारे हात पण लागतात. दोन प्रेमाचे शब्द पण लागतात. मायेने पाठीवर फिरणारा हात पण हवा असतो. शरीरसुख तर वेश्यापण देतात पण त्या मध्ये असतो फक्त व्यवहार एक भावना " मी शरीरसुख देते तू मला पैसे दे"की संपले नाते . मात्र पती पत्नीचे नाते हे अलौकिक नाते असते. येथे असते "समर्पण " त्याग असतो. व्यवहार तर मुळीच नसतो.एकाची मिठी दुस-याला मिठास देते. दोघांमधे विश्वासाचे नाते असते. राहूलला याची अनुभूती कधीच आली नाही. तो तहानलेला होता. निखळ प्रेमासाठी बाकी पत्नी कडून त्याच्या कोणत्याही आपेक्षा नव्हत्या. त्या आपेक्षा ती पूर्ण पण करणार नाही. कारण तो ठेवा तीने आपल्या प्रियकराला अर्पण केला होता. सारे लुटलेली ती कशी सुखी ठेवणार नव-याला.? लग्नाला वर्ष उलटून गेले. राणी अजून आपले प्रेम विसरली नव्हती. तिने प्रियकर राहूल चा शोध सुरू केला. तसा तो दूर नव्हता अडचण होती ती आईची. नव-याला तर ती कसपटा समान लेखत होती. नवरा म्हणजे आपल्याला पडलेले " दुस्वप्न " कारण सोडायची वेळ आली तर यू मिनिटांनी त्याला सोडणार होती मग डर कशाला? . आज तिला राहूल भेटणार होता. ती त्याला भेटायला खूप बेचैन होती. " आपलं पहिले प्रेम " म्हणजे राहूल, आपल्या तारुण्याची सर्वात मोठी निशाणी. ओंजळीत अवचित सापडलेला मोती .आपण कोणचीच होऊ शकत नाही. असे तिला वाटे.आज किती तरी दिवसाने ती राहूल च्या मिठीत होती .त्यांच्या स्पर्शासाठी ती असूसली होती. राहूल ही तहानला होता तो तर केंव्हा पासून या स्वर्गसुखची वाट पहात होता.मग काय ? त्यानेही तिला ओरबाडून घेतली.गोड असे विरळ क्षण. डोळ्यात साठवून ती घरी निघाली " बावलट नवरा घरी आला तर बचबाची नको " म्हणून घरच्या दिशेने वेगाने चालत होती. बस थांब्यावर ती बसची वाट पहात होती. चेह-यावर तृप्ती दिसत होती. भाण हरवलेले ती ; कुठे कशाचे भाण होते. अचानक कुणी तरी पाठीमागून डोळे झाकले. ती भाणावर आली. डोळ्यावर चा हात हातात घेतला.आणि पुन्हां हरवून गेली. तो हात तीच्या ओळखीचा होता. संजय तिचं दुसरं प्रेम. आज अवचित सुखाची रास चालून आली होती. आताच तृप्तीचा ढेकर देत ती बाहेर आली होती. आणि पुन्हा सुखाने आरास मांडली.ना ना करत ती संजय बरोबर अखेर गेलीच संजय म्हणजे तारूण्यात भेटलेला शारीराचे सोने करणारा पुरूष .तो येतो तेव्हा तिला ओरबाडून जातो.आज तो मोकळा जाईलच कसा ?. मनात नसताना ती त्याच्या स्वाधीन झाली. संजयने.पुन्हा तृप्तीचा ढेकर देत ती बाहेर पडली. संजय तीला बस स्टॉपवर सोडून निघून गेला.घाई घाईने तीने घर गाठलं.पण अजून नवरा आला नव्हता .तीने मोकळा श्वास घेतला.घाईत घाईत कपडे बदलले, टि.व्ही.चालूकरून चहा ठेवला. फ्रेश झाली .एव्हाना चहा झाला होता.वाफाळलेला चहाचा कप तोंडाला लावणार इतक्यात दारावरची बेल वाजली. दारात नवरा होता. विस्कटलेले केस,पायात चप्पल नव्हती. मळलेले कपडे, डोळे लाल .ती हबकून गेली.पायाखालची वाळू सरकली तीच्या. त्याने तिच्याकडे छद्मीपणे पाहिले. आणि तोल सावरत तो बेडरूममध्ये गेला.एव्हाना चहा थंड झाला होता. तिला राग आला पण बोलण्या अधिकार नव्हता. तो ती गमावून बसली होती. नवरा चार तासांपूर्वी आला होता. राणीची वाट पाहून तो निघून हातभट्टीच्या गुत्त्यावर गेला होता. बयकोवरचा राग दारूच्या बाटलीतून बाहेर काढत होता. आपली बायको कुठे गेले हे त्याला माहित नव्हतंच पण नात्यांची " लक्ष्मणरेषा "तीने पार केली होती.दारूने दुःख विसरता येते याची जाणीव त्याला झाली होती. त्याला मुक्तीचा मार्ग सापडलेला होता. दारू आपली उत्तम सहचारिनी होऊ शकते याची जाणीव झाली. आता तो अखंड बुडून लागला दारू त्याला " प्रयेसी "वाटू लागली. मात्र तो चुकून सुध्दा वाईट बोलता नव्हता नशेत तो शांत व्हायचा आगदी "स्थितप्रज्ञ "सारखा राणी फक्त पहात होती. तिला बोलता येत नव्हते. मनातून ती खाजील झाली. ....

       .. प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे
               पोई कल्याण ठाणे
                     अध्यक्ष
       महाराष्ट्र साहित्य षरिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण )
                      Copyright